भैरवगड आणि सोनगड/नरसिंहगड
कोकणातील किल्ले बोललं कि बहुतेक जणांना जलदुर्ग आठवतात. त्यात मी मे महिन्याचा गर्मीत केलेल्या योजनेमुळे बहुतेक जणांना आदी सागरी किल्लेच वाटले. माझी योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिल्ले, कोट आणि काही जलदुर्ग बघण्याचा होता. त्यात सहा दिवसाची सुट्टीचा बरेच जणांना जमत नव्हतं, तर काहींना फक्त शुक्रवार ते रविवार जमत होता. मग शेवटी अजय मिश्रा आणि मी दोघंच जायायचे ठरवले. मी सगळा आराखडा तयार ठेवला. मे महिन्यामुळे ट्रेन बस सगळेच भरलेले होते. त्यात आम्ही इथून दुचाकी बसमधून नेणार आणि तिथे चालवणार होतो. पण अजय ने सांगितले आपण इथून बाईकने जाऊ. तस ठरल्याप्रमाणे आम्ही १ दिवस पूर्ण प्रवासाला द्यायचा ठरला. आणि १० मे ला आम्ही सकाळी ८ ला सुरु केलेला प्रवास रात्री ८ ला राजापूरला थांबवला. २० वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्गावरील कामामुळे ट्राफिक आणि खेड पासून पुढे लागलेल्या पावसाळामुळे आम्हाला उशीर झाला. पुढे कणकवलीला जाणार होतो पण बरेच हॉटेलला फोन करून विचारला पण रहायला जागा नव्हती आणि उशीर हि खूप झाला होता. म्हणून मग राजापूरलाच थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला भैरवगड साठी प्रवास चालू केला.
दिवस दुसरा
वनदुर्ग भैरवगड
पायथ्याच गाव भैरवगड पण तालुक्यातून यायचं असेल तर मुख्य गाव नरडवे सांगायला लागते. कणकवली ते भैरवगड पायथा अंतर २७/२८ किमी आहे.
आम्ही सकाळी राजापूर-कणकवली भैरवगड असा ८०/८५ किमीचा अडीच तास प्रवास करत, पाऊणे अकराला गडाचा पायथ्याला पोहचलो. अकराला गड चढायला सुरवात केली. सुरवातीला जरा सुद्धा हवा नव्हती त्यात वरील पट्ट्यात सोंडेचा खडा चढ होता. पण सोंड असल्यामुळे क्वचित एकाद दुसरं झाड होतं त्यामुळे उन आणि प्रचंड गर्मी होत होती. पण सोंडेवर मध्ये मध्ये वारा हि लागत होता. म्हणून बर वाटत होते. तरी हि गडमाथ्यावर पोहोचायला आम्हाला सव्वा तास लागला.
गडाचे वर्णन
गडावर जास्त अवशेष दिसत नाही. गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे भैरावाचं मंदिर. मंदिरासमोर चौथऱ्या वर दीपमाळ आणि दोन लहान तोफा आहेत. चौथऱ्याच्या पाठीमागे (आपल्या) उजव्या बाजूला मारुतीचं शिल्प आहे. मंदिरचा परिसरात अजून काही उध्वस्त चौथऱ्याचे अवशेष दिसतात.
माथ्यावर पोहचण्याचा अगोदर काही पायऱ्या लागतात. तसेच माथ्यावर पोहचण्याअगोदर तटबंदी चे काही दगड दिसतात, पण ते सहजा कळून येत नाही. नीट बघितले कि कळते.
माथ्यावर मंदिराकडे जाताना वाटेतच समोर झाडांमध्ये एक बुरुज, तटबंदी दिसते. बहुतेक बालेकिल्ल्याचा बुरुज असावा. बुरुजाचा डावीकडून बुरुजाचा तटबंदीमधून वाट मंदिराकडे जाते. मंदिराच्या पाठी एक वाट जाते. ह्या वाटेने खाली गेलो असता खाली पाण्याचा झरा लागतो. आम्ही गेलो तेव्हा तिथे छोट्या डबक्यात खराब पाणी होते. पण पिण्यायोग्य नव्हते. आजूबाजूला पडलेल्या दारूच्या बाटल्यावरून समजून येत होते पाणी खराब का झाले असावे.
मंदिरासमोर डावीकडे एक वाट जाते. ह्यवाटेने पुढे गेलो असता पुढे एक मातीच्या ढिगाऱ्यासारखी एक छोटी तटबंदी दिसते. बहुतेक ह्या बाजूची तटबंदी असावी. त्याचा उजव्याबाजूने वाट पुढे जाते. पुढे जाऊन एक वाट डावीकडे खाली जाते. बहुतेक ह्यवाटेने दिगवले,रांजणगाव मध्ये जाता येते. तर एक वाट डावीकडे झाडीतून जाताना दिसते. ह्यवाटेने पुढे जाऊन पाहिले असता वाट पुढे थोडी खाली जाते. आणि नंतर पुन्हा पुढे सपाटी लागून पुढे जंगलात जाताना दिसते. पुढे दाट जंगल असल्यामूळे जास्त पुढे न जाता पुन्हा पाठी फिरून गड उतरायला सुरवात केली. गडाचा डोंगर खूप पसरलेला आहे आणि त्यावर जंगल हि खूप आहे. त्यामुळे जर पूर्ण डोंगर फिरायचा असेल तर सोबत गावातील जाणकार वाटाड्या पाहिजे.
तरी आम्हाला गड चढउतार आणि गड पहायला साडेतीन तास लागले.
प्रवास माहिती:
ह्या गडावर जाण्यासाठी स्वतःची गाडी असेल तर उत्तम. कारण त्यामुळे तुम्ही एका दिवसात भैरवगड आणि सोनगड करू शकता. एसटीने एका दिवसात एकच गड होईल.
कणकवली तालुक्यातून नरडवे साठी ४ फेऱ्या आहेत.त्यातील सकाळी ८ ची पहिली एसटी आहे. आणि संध्यकाळी ५/७ ची वस्तीची एसटी आहे. ह्या दोन एसटी भैरवगड गावात वर येतात,दुपारच्या दोन एसटी ( बहुतेक १२ आणि ३ ची) वर येत नाही
![]() |
| सुरवातीला गडावर जाणारी वाट, दुसऱ्या फोटोत इथूनग वर डावीकडे चाड्याला लागते. आणि वर सोंडेवर पोहचल्यावर इथून खडी चढाई आहे. |
![]() |
| पहिला फोटो गडमाथा.दुसऱ्या फोटोत माथ्यावर पोहचण्याआधी पायऱ्या लागतात. माथ्यावर असलेली तटबंदी आणि बुरुज आणि मंदिराचे फोटो |
![]() |
| मंदिराच्या समोरील वाटेने गेलो असता पुढे मातीच्या डिगारयात अवशेष दिसतात. नीट पहिले असता तटबंदी वाटते. |
सोनगड साठी प्रवास
भैरवगड पाहून आम्ही सोनगडसाठी निघालॊ. दोन्ही गड समोरासमोर दिसतात. भैरवगड गावातून सोनगडच्या पायथ्याचा गावाला पोहचायला ८/९ किमी चा रस्ता आहे, पण आम्हाला गावातील लोकांनी शॉर्टकट म्हणून नवीन बनत असलेल्या धरणातून जायायला सांगितले. लोकांचा तो नेहमीचा पण कच्चा मातीचा रस्ता होता. कारण तिथे अजून काही वाडी आहेत. शॉर्टकटमुळे आम्हाला उलट जास्तवेळ लागला. त्यापेक्षा डांबरी रस्त्याने गेलो असतो तर लवकर पोहचलो असतो.दोन गडाच्या मधून गड नदी वाहते त्यामुळे नदी पलीकडील सोनगड/ नरसिंहगड कुडाळ तर भैरवगड कणकवली तालुक्यात येतो .
तिसरा दिवस
सोनगड/ नरसिंहगड
कोकणातून गडावर जायला दोन गावातून वाटा आहे. एक वाट पवारवाडी (दुर्गामाता नगर) मधून तर एक वाट घोटगे गावातून जाते. बहुतेक कोल्हापूर जिल्हातील शिवडाव गावातून ५ किमी ट्रेक करून हि येऊ शकता. हि वाट गडावर जिथे एक बुरुज आणि दरवाजाचे अवशेष आहे तिथून सोंडेवरून येत असावी. कारण त्या बुरुजाचा इथे पायऱ्या आहेत आणि खाली समोर वाट सोंडेवरून जंगलात जाताना दिसते. पण इथे चढायला अथवा उतरायला रशी लागेल.
शिवडाव वरून येणारी वाट जंगल पठारावरून येत असावी. कारण कोल्हापूरचा भाग वरती आहे. आणि आपण कोकणातून खालून गडावर चढतो.
पहिला अयशस्वी प्रयत्न मग वस्ती आणि दुसऱ्या दिवशी वाटाड्या सोबत गडावर
पहिल्या दिवशी आम्ही जिपीएस वर साडेतीन वाजता गड चढायला सुरवात केली. पण ह्या वाटेने क्वचितच लोक जात असावे म्हणुनच वाटेत झाडेझुडपे, पालापाचोळा खूप पडलेला होता. सुरवातीला १५/२० वाट मळलेली होती नंतर पुढे एके ठिकाणी झाडेझुडपे पडून वाट बंद झाली होती. पण जिपीएसची वाट तिथूनच पुढे चालली होती. मग बाजूच्या झाडाझुपातून वाट करत आम्ही पुन्हा जिपीएस च्या साहाय्याने वाटेला चालू लागलो. इथून पुढे वाटेत पालापाचोळा असल्यामुळे मळलेली दिसत नव्हती. तरी पण आम्ही ५ ते १० मिनिटे जाऊन बघितले.
सव्वा चार वाजले होते. पुन्हा पुढे वाट चुकली किंवा शोधण्यात उशीर झाला असता. तर गडावर पोहचायला उशीर होऊन, उतरताना काळोख झाला असता. आणि गड हि नीट पाहता आला नसता म्हणून, आम्ही पुढे जास्त धोका न घेता पाठी फिरायचा निर्णय घेतला.
पुन्हा कधी तरी करू ह्या निर्णयाने उद्याचा गडासाठी पुढची योजनेनुसार निघालो. जाताना पवारवाडीच्या गावातून एका घरातून गावातील वाटाड्याचा नंबर घेतला (पण तो पुढे आम्ही त्याला नंबर फिरवला त्यावेळी लागला नाही). आणि पुढे निघालो.
आम्ही घोटगे गावी चहापाणी साठी थांबलो. घोटगे गावातून वाट जाते म्हणून थोडी तिथे हॉटेलवर वाटाड्याची विचारपूस केली. त्यांनी गुरव वाटाड्याचा नंबर दिला. वाटाड्याला फोन केला, त्याने १००० रुपये सांगितले. त्यांनी कमी केले नाही. मग आम्ही आधी इथे राहायची आणि जेवायची सोय होते का पाहू, आणि झाली तर मग हा गड करूनच जाऊ असा विचार केला. कारण पुन्हा खास ह्यासाठी इतके लांब यायचं कधी जमेल माहित नाही.
हॉटेल वाल्याने सांगितले पुढे तेली खानावळ आहे, त्यांना विचारा. तिथे जेवायची आणि राहण्याची सोय होईल. तेलींना विचारले, त्याची एक जास्त खोली होती पण त्याचे पावणे आले होते. त्यामुळे तिथे आमची सोय झाली नाही. त्यांनी तिथेच पुढे त्याचेच चुलत भाऊ यांच भाजीचा दुकान आहे देविदास तेली त्यांना विचारायला सांगितले. त्यांना विचारला त्याचाकडे पण नव्हते. पण त्यांनी आम्हाला थोडं थांबायला सांगितले आणि दुसरारीकडे कुठे आमची सोय करता येते का बघत होते. शेवटी त्यांनी तिथे सिंधुदुर्ग बँकेचचा वर एक कर्मचारीची खोली होती तिथे सोय केली. तो २ दिवस सुट्टीसाठी बाहेर गेला होता, सोमवारी येणार होता त्याला फोनवर विचारून, आम्हाला तिथे राहायला दिले.
त्यामुळे आमची राहण्याची आणि अंघोळीची सोय झाली. त्यांना आम्ही जाताना ठरल्याप्रमाणे ५०० रुपये दिले. देविदास भाऊ आणि त्यांचा सोबत अजून एक गावची व्यक्ती आम्हाला राहण्यासाठी सोय व्हावी म्हणून खूप खटपट केली. मग रात्री आम्ही त्यांचेच चुलत भाऊ तेली ह्यांच्या खानावळी मध्ये जेवलो. जेवण पण एकदम घरघुती होत आणि प्रत्येकी १२०रु घेतले.
गड चढायला सुरवात
गुरव वाटाडे काकांनी आम्हाला सकाळी ६ वाजता लिंगेश्वर मंदिराजवळ बोलावले होते. तिथून त्यांनी आम्हाला काल ज्यावाटेने सुरवात केली होती तिकडेच घेऊन गेला. सकाळी पावणे सात वाजता आम्ही पुन्हा त्याच वाटेने गड चढायला सुरवात केली.
साधारण पाऊण तासात आम्ही गडाच्या सोंडी वर पोहोचलो. सोंडेवरून वाट, सोंडेच्या टेकाड वरून चढउतार करत. गडाला लागून गडावर जाते. आम्ही काल जिपीएस वर चाललेलो आणि वाटाड्या नेत होता तीच वाट होती. त्याने जिथे वाट बंद झाली होती त्याचा बाजूने कोयत्याने झाडी तोडून वाट केली. आम्ही जिपीएसने गेलो असतो तर बरोबर गेलो असतो पण आम्ही उशीर झाला असल्यामुळे धोका नाही घेतला.
तासात आम्ही गड माथ्यावर पोहोचलो.
गडाची बुरुज आणि काही ठिकाणी तटबंदी अजून आपलं अस्तित्व टिकवून आहे. पण वाटते काही वर्षात डागडुजी न झाल्यास तीही ढासळून जाईल. पवार वाडीतून गडावर जाणार्या वाटेवर आपल्याला बुरुज, पायर्या लागतात. माथ्यावर मंदिराचा चौथर्यावर भैरवाची सुबक दीड ते दोन फुटाची मुर्ती आहे. त्या मूर्ती मागे अजून एक फुटाची छोटी भैरवची मुर्ती आहे. दर्शन घेऊन आम्ही मंदिराचा पाठच्या बाजूला असलेल्या बुरुजाकडे गेलो, ह्या बुरुजाला दरवाजा असावा, दरवाज्याची चौकट दिसत नाही. पण पायर्या आहेत. ह्या दरवाजाने वाट सरळ दोन डोंगरातील धारेवर जाताना दिसते ( बहुतेक शिवापूर गावात जात असावी). बुरुज पाहून आम्ही डावीकडे चालत गेलो. इथे एक गुहा आहे. ही गुहा आत मध्ये 50 मीटर अंदाजे खोल असावी. त्याकाळी शत्रू पासून लपण्यासाठी हि गुहा वापरत असे , असे वाटाड्याने सांगितले.
गुहेचा तोंड खाली होत आणी तिथे जाण्यासाठी डोंगराचा कडेने वाट होती, कालांतराने वाट निसरडी झाली होती. त्यामुळे रशी विना जाने धोक्याचे होते. पण तिच्यावरुन झाडा झुडपातून जाता आले असते. पण आमच्या वाटाड्याला लग्नाला जाण्याची घाई होती म्हणुन त्यांनी आम्हाला आत जनावर असेल सांगून तिथून घेऊन गेला.
तिथून पुढे घोटगे गावाकडून जी वाट येते तेथे तटबंदी, बुरुज आणि दरवाजा दिसतो. पुन्हा आमच्या वाटाड्याला लग्नाची घाई झाली होती. तिथे काही नाही गुहा दाखवतो म्हणुन गड उतरायला सुरवात केली. घोटगे गावाची वाटे वरील बुरुज, तटबंदी जरा खालीच होती. तिथे गेलो असतो तर आम्हाला अजून एक तास लागला असता. म्हणुन मग मी हि लांबूनच फोटो काढला.
गुरव जी गुहा दाखवत होता, त्याला भिवाची आकडी म्हणतात.
भिवाची आकडी
एक मोठ्या उभट कातळात उभा भेग होती. आकडी म्हणजे गावी लोक कंबरेला पाटी कोयती अडकवतात त्याला आकडी म्हणतात. त्या काळाचा आकार त्या सारखा होता म्हणून भीवाची आकडी म्हणतात. पण भिवा कोण कळला नाही. हि आकडी आपण जेव्हा गडाच्या एकदम वरच्या टप्प्यात पायर्या येतात त्याचा आधी कातळ टप्पा लागतो तिथे उजवीकडे दिसतो. सोनगड वर जास्त करून घोटगे गावातून गावकरी येत असावी. गुरवने सांगितले नवरात्रीला गडावर मंदिरात कार्यक्रम असतो त्याचवेळी फक्त एकदा हि वाट साफ करतो.
सोनगडला आम्हाला एकूण 3 तास गेले. दहा वाजता आम्ही पुन्हा घोटगे गावात चहा नाश्ता करून अकरा वाजता मनोहरगडला निघालो. पुढील भागात मनोहरगड आणि हनुमंतगड.
![]() |
| वरील तीन फोटोत सोनगड दिसत आहे. तर चौथ्या (वरील) फोटोत गडाचा सोंडेवरून काढलेला फोटो |
![]() |
| गडावर पोहचण्याचा अगोदर बुरुज आणि पायऱ्या आहेत. गडावरील भैरोबा ची मूर्ती, तोफ. तसेच वाड्याचा चौथरा आहे. |
![]() |
| (वरून खाली) गडावरील वाड्याचा चौथरा अवशेष आणि त=चौथऱ्या वरील फोटो. बुरुजाचा बाजूने दिसणाऱ्या पायऱ्या आणि सोंडेवरून जाणारी वाट, गडावरील माथा एका फोटोत दिसत आहे. तर शेवटी दोन फोटोत मंदिर |
![]() |
| आडव्या फोटोत वरून एका बाजूची तटबंदी अवशेष, पाण्याची टाकी, घोटगे गावाचा वाटेवरील बुरुज आणि गुहेचा तोंड असलेली जागा आणि निसरडी वाट |
![]() |
| वरती आणि खालील फोटो गडावरून दिसणारा परिसर. भिवाची आकडी (लंबाकृती दगडाचा फोटो) आणि वाटेत दिसलेले रानगवाच्या खुरांचे निशाण |









