दिवस तिसरा
सोनगड ते मनोहर-मनसंतोष प्रवास
सोनगड ते मनोहर-मनसंतोषगड, पांडुर-झाराप वरून आंबोली घाटाला रस्ता जातो त्यामार्गे शिरणशिंगे, गोठवेवाडी ९६ किमी अंतर होता. तर दुसरा रस्ता गाव नरुर-सकिर्डे-शिवापूर गाव मार्गे ७३ किमी अंतर होत. हा रस्ता आतील गावातून जात होता पण प्रवास वेळ तेवढाच दाखवत होता.
त्यामुळे आम्ही झाराप वरून आत गेलो. आंबोली घाटाचा रस्ता सोडून शिरशिंगेसाठी आत जातो तो रस्ता नागमोडी आणि छोट्यामोठ्या घाटाचा होता म्हणून मनोहरगड पोहोचेपर्यंत अडीच वाजले.
शिरशिंगे आणि शिवापूर हि दोन्ही गाव एक घाट रस्त्याने जोडली आहेत. हा घाट रस्ता गडाचा डोंगरातून जातो. गोठवेवाडीतून घाट रस्त्याने गेलो असता, शिवापूर गावाची वेस लागायच्या आधी डावीकडे एक मातीचा रस्ता गडाचा कातळ टोपीपर्यंत जातो. गोठावे वाडीतून घाट रस्ता चांगला आहे. पण शिवापूर गावातून येणारा रस्ता खूपच मातीचा अथवा खराब होता. त्यामुळे गोठवे वाडीतून जाणे उत्तम.
मनोहर-मनसंतोषगड
गडाच्या पायथाचे गाव शिरशिंगे.
गडडोंगराचा एका बाजूला एक सुळका दरी अथवा खिंडी मुळे वेगळा झालेला दिसतो तो सुळका म्हणजेच मनसंतोष गड. मनसंतोष गडावर जाण्यासाठी खालील टप्यात कातळ पायऱ्या आहेत पण वरच्या टप्पात प्रस्तरोहणचा सामान असेल, तरच वर जाता येते असं वाचलं होतं कारण वर पायऱ्या नाही. म्हणून आम्ही गेलो नाही. मनसंतोषला जाण्यासाठी नैसर्गिक गुहेच्या बाजूने पुढे कातळाला वळसा घालत वाट जाते. आपण जेव्हा कातळटोपीने बाजूने जातो तिथेच वरती ह्या गुहा आणि तिथे जाणारी वाट दिसते.
गडाच्या कातळ टोपीपर्यंत रस्ता केला आहे. त्यामुळे गावातून गडाच्या कातळ टोपीपर्यंत चालत जाण्याच्या बराच वेळ वाचतो. अजून एकदोन वर्षात डांबरी रस्ता होईल असे वाटते.
आम्ही डावीकडे गडावर जाणारा रस्ता सुरु होतो तिथेच दुचाकी उभी केली आणि पुढे चालत गेलो.
बाईक अजून पुढे गेली असती, पण मातीत सरकली अथवा रुतली असती. म्हणुन मग आम्ही चालत गेलो. तरी ह्या रस्त्याने आम्हला कातळ टोपी पर्यंत पोहचायला २० मिनिटे लागली. इथून गडाचा उजव्या बाजूने कातळाला लागून वाट जाते. ह्या वाटेने गड माथ्यावर पोहोचायला एक तास लागला.
कातळटोपीच्या बाजूने चालताना जेव्हा वाट डावीकडे वर वळते, तिथे खालून शिवापुर गावातून येणारी वाट मिळते. इथे एक ढासळलेला बुरुज आणि उध्वस्थ तटबंदी दिसते. बहुतेक पहिला इथे दरवाजा होता असे वाचले होते.
गडाचा पायऱ्या ब्रिटिशांनी उध्वस्त केल्या होत्या, त्यामुळे जेव्हा आपण गडाचा मुख्य उध्वस्थ दरवाजा, बुरुज जवळ पोहचतो. त्याचा आधी लोखंडाच्या पायऱ्या लावलेल्या आहेत. त्याचा वरती दरवाजा पर्यंत पायऱ्या आहेत.
गडावर छत्तपत्री शिवाजी महाराज ३४ दिवस राहिले होते. एवढे दिवस विश्रांती साठी राहिले होते का अन्य कारणा साठी ते कारण स्पष्ट कुठे सांगितले नाही. पण माझ्या मते गडावर गेल्यावर गडाचा भवतालीचा आंबोलीच्या घाटाचा निसर्गमय परिसर खूपच सुंदर वाटते.
गड वर्णन
गड माथ्यावर पोहचल्यावर आम्ही डावीकडून गड फेरीला सुरवात केली.
आपण ज्या वाटेने गडावर येतो, गडाच्या त्या बाजूला तटबंदी दिसते. गोठवेवाडीच्या बाजूला तटबंदीचा एकही अवशेष दिसत नाही. तर त्याचा विरुद्ध बाजूला म्हणजे शिवापूर गावाचा बाजूला हि तटबंदी दिसत नाही. पण डोंगराचा कड्याला एक दोन ठिकाणी तटबंदीच्या दगडाचे काही अवशेष दिसतात.
माथ्यावर आल्यावर आपल्याला पहिला ढासळलेला मुख्य दरवाजा आणि बुरुज दिसतो त्याचा डाव्या बाजूला तटबंदीच्या बाजूने पुढे गेलो असता. पुढे तटबंदी मध्ये शौचकूप दिसतात. एकूण गडावर ३/४ शौचकूप आहेत. गडावर एक विहीर आहे. जी गडावरील एकमात्र पाण्याची सोयआहे, पण त्यातील पाणी खराब असल्यामुळे पिण्यास योग्य नव्हते.
माथ्यावर औदुंबराचा मोठा झाडाखाली भैरोबा, गजलक्ष्मी आणि इतर देवांच्या मूर्ती आहेत. झाडाचा भोवती अर्ध वर्तुळाकार चुन्याचा गाडा आहे. अजून एक मुख्य वास्तू गडावर आहे ती म्हणजे वाडा.
आम्ही डावीकडून सुरवात करून पुढे सरळ समोर गेल्यावर, शेवटी मनसंतोषगडचा सुळका आहे. त्याआधी मध्ये एक उंचवटा लागतो, बहुतेक बुरुज असावा असं. सुळका पाहून उजवीकडे शिवापूर गावाच्या बाजूने चालू लागलो. अजून गडावर जास्त काही अवशेष दिसले नाही. अश्या प्रकारे गड फेरी पूर्ण करून साडेपाचला गड उतार केला.
सहा वाजता गोठवेवाडीत पोहचलो.
दुचाकी असल्यामुळे काळोख होण्याचा आत आम्हाला मुख्य रस्त्याला पोहचायचं होत. मे महिन्यात सूर्यास्त उशिरा होतो त्याचा एक फायदा असतो. त्यामुळे आम्ही काळोख होण्या अगोदर मुख्य रस्त्याला पोहचलो. पुढे आम्ही आधी बांदा ल्या राहणार होतो पण बांदा पेक्षा सावंतवाडी जास्त मोठं शहर होत आणि अंतर हि जास्त फरक पडत नव्हत. म्हणून आम्ही सावंतवाडीला रहायला गेलो. मे महिना असल्यामुळे बहुतेक हॉटेल फुल्ल होते. मग शेवटी एका हॉटेल मध्ये १२०० रुपये देऊन एक अवतानुकूलित खोली घेतली.
उद्या हनुमंतगड, बांदा भुईकोट, यशवंत गड आणि वेंगुर्ल्याची पोर्टींगीझ वखार करायची योजना होती.
दिवस चौथा
सकाळी साडेसात वाजता आम्ही हनुमंतगड साठी निघालो. सावंतवाडी ते हनुमंतगड, फुकेरी गाव अंतर २६ते ३०किमी आहे. बांदामार्गे ३० तर विळवडे मार्गे २६किमी आहे. दोनच मिनिटाचा फरक दाखवत होता. मग आम्ही बांदा मार्गे जायायचं ठरवल. बांदाला नाश्ता करून पुढे फुकेरीला गेलो.
हनुमंतगड
 |
| टकमक टोकावरून दिसणारा हनुमंतगड |
पायथ्याचं गाव फुकेरी, गाडी अगदी वर पर्यंत जाते तिथून ५ मिनिटात चढून गड माथ्यावर पोहचतो. गडमाथा लांब पसरलेला आहे. त्यामानाने रुंदीला तोकडा आहे. गडावर जास्त अवशेष दिसत नाही. गडाची तटबंदी अखंड नाही मध्ये मध्ये टप्प्यात दिसते. आम्हाला गडाला दोन दरवाजे दिसले. एक महादरवाजा ज्याने आपण गडावर प्रवेश करतो आणि एक दिंडी दरवाजा. ह्या दरवाजा फुकेरी गावाचा दिशेला आहे. त्यामुळे अंदाजे पूर्वी गावातून येत असावे,
आम्ही दुचाकी पायथ्याला लावून गड चढायला सुरवात केली. पाचच मिनटात महादरवाजा जवळ पोहोचलो.
दरवाजाची कमान नाही पण बाजूचे अवशेष आणि बुरुजाचे अवशेष बाकी आहे. पहिल्या दरवाजाने आत आल्यावर वाट डावीकडे जाते, तिथे दुसरा दरवाजा आहे. ह्या दरवाजाच्या बुरुज वरना ढासळला आहे पण बाकी चांगल्या अवस्थेत दिसतात. ह्या दरवाजाने प्रवेश केल्यावर आपण गड माथ्यावर प्रवेश करतो. समोर प्रवेश केल्यावर आपल्याला दरवाजाचे दगड पडलेले दिसतात.
महादरवाजा गडाच्या एका टोकाला आहे, त्यामुळे दरवाजाने प्रवेश केल्यावर उजवीकडे सरळ गड पसरलेला आहे. अंदाजे १ किमी लांब असेल. पुढे थोड्या अंतरावर मोकळ्या माथ्यावर शिवरायांची मूर्ती आणि त्याचा बाजूला दोन तोफा ठेवलेल्या आहेत.
शिवरायांचे दर्शन घेऊन पुढे डावीकडच्या वाटेने चालू लागलो. मूर्तीमागे टेकाडभाग आहे. त्यामुळे इथे तुम्हाला डावी किंवा उजवीकडून पुढे गडफेरीसाठी जायायला लागते. आम्ही डावीकडून गेलो. डावीकडील वाट माथ्याचा कडेने जाते. त्यामुळे कड्याला समांतर अशी तटबंदी दिसते, अशीच तटबंदी पूर्ण गडाला दिसते काही काही ठिकाणी दिसते. इतर ठिकाणी पडली असावी. बहुतेक तटबंदीचा वरील भाग ढासळलेला असावा, म्हणून सगळीकडे अशाप्रकारची तटबंदी दिसते.
गडावर सहयाद्री प्रतिष्ठाणने फलक लावल्यामुळे त्याचा फायदा होतो. सुरवातीला वाटेत आम्हाला श्री पिसादेवीचा फलक दिसला पण तिथे देव किंवा मंदिराचे काही अवशेष दिसले नाही. केवळ आम्हाला एक मोठा पाषाण दिसला.
तिथून पुढे चालू लागल्यावर वाटेत गडावरच एकमात्र पाण्याचं टाक /तळ दिसते. थोड पाणी होत पण पिण्यास योग्य नव्हते. टाकी समोर कड्याला तटबंदी दिसते.
टाकी कडून पुढे माथ्याचा टोकाला गेलो. तिथे हि काही ठिकाणी तशीच तटबंदी आणि बहुतेक बुरुज हि दिसतो.
गडाचा ह्या टोकाला आले असता समोर दूरवर पारगड दिसतो.
इथून आम्ही दुसऱ्या बाजूने म्हणजे फुकेरी गावाचा बाजूने गडफेरीला सुरवात केली. त्याआधी मध्य भागी असलेल्या झाडांन झुडपांमध्ये काही अवशेष आहेत का पहात होतो, पण काही दिसले नाही.
फुकेरी बाजूने फेरी मारतेवेळी सुरवातीला एके ठिकाणी खाली थोडा खोलगट भाग आहे. तिथे तटबंदी दिसते. पाणी अडवण्यासाठी जशी तटबंदी बांधतात तशी आहे. अजून पुढे गेलो असता पुढे पुन्हा खोलगट भाग लागतो. हिथे हि तटबंदी दिसते. ह्या तटबंदी मध्ये दिंडी दरवाजा आहे. ह्या दरवाजा फुकेरी गावाचा दिशेला आहे. बहुतेक पूर्वी गावातून ह्या वाटेने येत असावे. दरवाजा ढासळला आहे तरी पण अजून थोडा चांगला अवस्थेत दिसतो. दरवाजा पाहून वर आल्यावर तिथे एक तोफ दिसते.
तिथून आम्ही वर टेकाड/ उंचवटा भाग आहे त्याच्यावर गेलो. तिथे राजसदर चा फलक लावला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे शिवरायांचा मूर्तीच्या पाठी मागे हा टेकाड/उंचवटा भाग आहे. त्या टेकाडावर राजसदर असल्याचा फलक आहे. पण त्यावरील दाट झाडीमुळे काहीच अवशेष दिसत नाही. अथवा हि सदरची जागा असावी म्हणून फलक लावला असावा.
सदरेची जागा पाहून पुन्हा महा दरवाजाने गडउतार केला. तरी पूर्ण गड पहायला आम्हाला पाऊणे दोन तास लागले.
हनुमंत गड सोबत आमचे सिंधुदुर्ग जिल्यातील वनदुर्ग पूर्ण झाले. आता आमचे पुढे भुईकोट, किनाऱ्या लगतचे आणि इतर गडकिल्लेची योजना होती. त्याबद्दल पुढील भागात लिहेल.
हनुमंतगड वरून आम्ही पुढे पुन्हा बांदा भुईकोट साठी गेलो. दुपारी १२.४० ला आम्ही बांदा पोहचलो.